पूर्ण भरलाच नाही.
अर्ध्या वरती असतानाच
एक धागा तुटला.
राहिलेल्या एकच धागा
जमेल तसं टाके घालून
पुढे जात आहे.
तो एकटाच पडल्यामुळे
कमकुवत झाला आहे.
तुटलेल्या धाग्यांची उणिव
आयुष्यभर जाणवणार आहे.
कधी दुःख, कधी सुख,
काही प्रसंग, सतत आठवण,
हे सर्व सोबत घेऊन
धागा एकटाच टिप घालत आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️