भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
हे त्यांचं बीद्र वाक्य आहे.
मला स्वामींचा कायम आधार आहे.
अडीअडचणीला ते मला कायम
साथ मला देतात.
मला स्वामींचे अनुभव पण
खूप छान आले आहेत.
स्वामींचा आशीर्वाद घेऊन एखादं काम करण्यासाठी घेतलं तर ती कामे माझी नक्कीच पूर्ण झाली आहेत.
माझा मुलगा तेव्हा बारावीत होता.
आणि अहोना टायफॉइड झाला. ताप इतका होता कि ते त्या तापात काय काय बडबडत होते. समजत नव्हते.तशाच अवस्थेत मी आणि तो दोघांनी मिळून त्यांना अॅडमिट केलं.आणि त्यांची परिक्षा आहे म्हणून तो परिक्षेला गेला.
मी एकटीच दवाखान्यात त्यांच्या सोबत होते.
डॉक्टरांनी हात टेकले आणि मला सांगितले
आम्ही प्रयत्न करत आहोत शेवटी देवाची मर्जी काहीच सांगू शकत नाही.
त्यांची तर नुसती तळमळ तळमळ चालू होती.
मला तर काहीच सुचत नव्हते. विचारांनी डोकं फुटायची वेळ आली होती.
शेवटी स्वामीनाच साकडं घातलं ह्या सर्वातून
अहो ना आणि मला तारायचं आणि सहीसलामत बाहेर काढायचं असे म्हणून
त्यांचे दोन्ही पाय घट्ट पकडून जो स्वामी समर्थांचा जप चालू केला.तो बराच वेळ करत बसले पहाटे पहाटे साडेतीन चार वाजता ते दिवसभराची तळमळ थांबून शांतपणे झोपले.आणि आठ दिवसांत ठणठणीत बरे होऊन घरी आले.
असे बरेच वेळा मला स्वामींच्या निष्ठेचे फळ मिळाले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️