दोष कोणाचा माझा की नशीबाचा
तू मला भेटलीस नाही.
तुझी माझी भेट झाली नाही.
जगाच्या पाठीवर
तुला खूप शोधलं
तू सापडलीच नाही.
अशी कोठे निघून गेलीस.
सखी तुला खूप
सांगायचं होतं.
तुझ्या सोबत
खूप बोलायचं होतं.
तुझा हात माझ्या
हाती घ्यायचा होता.
तुझ्या सोबत संसाराची
स्वप्नं रंगवायची होती.
तुला खूप खूप सुखात
ठेवायचं होतं.
तुला दुःख द्यायचं नव्हतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️