जगाच्या दृष्टीने मी फक्त एक सापाळ आहे..
असं असतं का तो नाही म्हणून तिनं जगणं सोडायच का?
तिला त्याच्या मागे जगायचा काहीच अधिकार नाही का?
ती पण माणूस आहे.तिच्या पण काही इच्छा असतील हे कसं समजत नाही.
तिच्या वयाचा पण विचार केला जात नाही.
सगळे नियम फक्त तिलाच का?
तो नसला तरी ती त्यांचे नातेवाईक संभाळते. त्यांच्या माघारी त्यांची सर्व कर्तव्ये ती पार पडते.तो नाही तर त्यांची कर्तव्ये पण तिला नाही पाहिजे.पण अस नाही होत.
बायको गेल्यावर पुरूष करतो का तिच्या माहेरी काही कर्तव्य नाही.तो तर जाणं येणं पण कमी करतो. तुच नाही तर मी तरी कशाला जाऊ.हे असले नियम फक्त तिला त्याला वेगळे नियम अरे बायको गेली की पुरुष जगतो का रंगहीन जीवन तो तर दुसरी करून मोकळा होतो. त्याला काहीच नियम नसतात. तो बाहेर हि लगेच पडतो. तिला मात्र सव्वा महिना बाहेर पडायचं नाही.
जास्त हसा खिदळायच नाही. खालमानेन जायचं खालामानेन यायचं.हि कसली पध्दत
तिला प्रत्येक गोष्टीत नियम पावलागणिक तिचे संस्कार काढायचे.टोचून बोलणं तू स्त्री आहेस तू अशीच राहायचं त्यांच मागे असंच जगायचं असंच रंगहीन जीवन जगायचं.
म्हणूनच नको वाटतं हे राहिलेलं आयुष्य जगायला. त्यापेक्षा तुझ्या कडे आलेलं केव्हाही चांगलं.
{कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.
जे अनुभवते जे समाजात चालू आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर साॅरी 🙏🙏}
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️