असं अर्ध्यावर सोडून गेलास
सांग ना गुन्हा कोणाचा
तुझा कि माझा का माझ्या नशिबाचा
एकटीने राहणं काय असतं
तुला कळणार नाही रे..
किती हि मुखवटा घातला
तरी मुखवटा मागचा चेहरा
जीव माझा जाळतो रे..
गुन्हा तर माझाच आहे
माझ्या नशीबाचा आहे.
खरी गुन्हेगार मी आहे.
म्हणूनच जळत जळत जगत आहे.
तू पुण्यवान होता म्हणूनच
या गुन्हेगारी जगाचा निरोप घेतला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️