त्याची सीमा मोजता येत नाही.
त्याचा परिघ काढता येत नाही.
ना त्याची बेरीज वजाबाकी होते
ना त्यांच्या गुणाकार भागाकार होतो.
त्याचा आलेख मांडला जात नाही.
त्याची सरासरी काढता येत नाही.
शून्यातून सुरू झालेलं प्रेम
अनंत अथांग असं वाढत जातं.
त्याची न सीमा असते.
ना बोलून दाखवलं जात
वासनेचा लवलेश नसतो तेच
प्रेम अनंत काळापर्यंत टिकत
जसं राधा कृष्ण, हिरा झांजा, लैला मजनू
असं प्रेम हवं असेल तर वासना न ठेवता
निःस्वार्थी निर्मळ असं प्रेम करावं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️