किती सौंदर्यवान चेहरा पहिला
तरी त्या चेहऱ्यावर तुटलेल्या
आरशाचा तडा दिसतोच
सरळसूत चेहरा दिसत नाही.
तसच एकदा का विश्वास तुटला की
तुटला विश्वास जोडता येत नाही.
जोडला तरी पूर्वी सारखा राहत नाही
त्यात एकदा का गाठ बसली की बसली
तो विश्वास सरळ सूत राहत नाही.
जरी ती व्यक्ती आपल्याशी बोलत असली तरी काही गोष्टी हातचं राखून बोलते वागते.
म्हणून कधीच कोणाचा विश्वास गमवू नका.
विश्वास कमवायला आयुष्य लागत. पण
विश्वास गमवायला एक मिनिट पुरेसा असतो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️