अन्याय मात्र ताबडतोब मिळतो.
किती ही लढा न्यायासाठी पण नाही.
खऱ्याच खोटं आणि खोट्याच खरं हाच तर न्याय आहे.न्याय मिळवणारा लढत राहतो.
न्यायाला शिक्षा होतो.आणि अन्याय मिळवणारा न लढता ही सहजच सुटून जातो. न्याय देवता खरं तर कानांनी ऐकू न्याय देणार असते म्हणून तर तिच्या डोळ्यांवर पट्टी असते. पण खरं तर न्याय देवताच आंधळी आहे. ती काय न्याय लावणार ऐकून न्याय देण्यापेक्षा ती व्यक्ती खरं बोलते का खोटं बोलते हे त्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसतं खरं बोलणारी व्यक्ती ताठ मानेनं जगायला बोलते. खोटं बोलणारी व्यक्ती कधीही ततपप करत डोळे खाली घालून भिरभिरत नजरेने बोलते.
जेवढं व्यक्ती डोळ्यांनी बोलते तेवढं ती सांगू शकत नाही न्याय देणाऱ्याला मन आणि डोळे वाचता यायला हवेत.म्हणजे खरा न्याय मिळेल.
मला तरी वाटत न्याय देताना व्यक्तीच्या डोळ्यात बघून न्याय द्यावा.
म्हणजे कोणावर ही अन्याय होणार नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️