प्रेमाची चेष्टा कधीच करू नये.
प्रेम अर्धावर कधीच सोडू नये.
प्रेम टाईमपास म्हणून कधीच करून
एखाद्याच मन दुखवू नये..
प्रेमात कधी व्हॅम्पायर होऊ नये.
प्रेम म्हणजे फक्त शारिरीक संबंध नाही.
तर प्रेम म्हणजे एकमेकांना साथ देण.
सुख दुःख वाटून घेऊन
एकमेकांना समजून घेणे.
एकमेकांच्या दोषांवर आरोप प्रत्यारोप
न करता प्रेम करणं तेच खरं प्रेम.
प्रेमात जीव द्यायचा असतो.
जीव घ्यायचा नसतो.
प्रेम हळूवारपणे उमलू द्यावे.
प्रेमात एकमेकांची काळजी घेणं.
प्रेम जेवढ समजून उमजून घेऊ तेवढं वाढत जातं.
प्रेम मनापासून करावे.तेच खरं प्रेम..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️