ना अपेक्षा होती,ना स्वार्थ होता.
एका वळणावर थांबलं
ते तेथेच थांबलो.
आयुष्य जगताना कधीच
त्या प्रेमाचा त्रास झाला नाही.
अडचण आली नाही.
पण मनावर कायमच कोरल गेल.
अडीअडचणीला मनापासून
हाक मारली तर ते तुझं प्रेम
मनाच्या कुपीतून आधार नक्कीच देत.
तू नसूनही तुझी साथ आहे असं
नक्कीच वाटतं.
सोबत असल्याचा भास असतो.
खांद्यावर तुझा हात असतो.
असं आपलं खरं प्रेम जीवनाच्या वाटेवर जीवनभर सोबत असेल.
फक्त एकदा जीवनाचा शेवट होण्याआधी
भेट व्हावी एवढीच इच्छा आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️