लहान वयातच लग्न झाले.
लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस
छान पार पडले.
ती स्वतःला भाग्यवान समजत होती.
पण थोड्याच दिवसात तिच्या समोर सत्य परिस्थिती यायला लागली.
तशी ती खचू लागली. डगमगू लागली.
खूप विचार करून ती ने एक निर्णय घेतला.
परिस्थिती बदलायची असेल तर
डगमगून चालणार नाही.
या व्यसनातून त्याला बाहेर काढावे लागेल.
परिस्थितीवर मात करून पुढे चालायला हवे.
तर या सर्व परिस्थितीतून आपण नवऱ्याला व्यसनातून बाहेर काढून व्यसन मुक्त करू शकतो.
तिच्या मनाचा निश्चय पक्का झाला.
परिस्थितीवर मात करत संघर्ष करत.
नियतीचा खेळ खेळत तिने स्वत:चे व नवऱ्याचे नशीब बदलले.
परिस्थितीवर मात करून सुखाचे दिवस आणले.
तिने जर परिस्थिती चुकीची होती.
असे म्हणून परिस्थितीला दोष देत बसली असती तर सुखाचे दिवस आलेच नसते.
परिस्थितीला दोष न देता.
तिने परिस्थितीशी लढून परिस्थिती बदलली.
आणि नवऱ्याला व्यसनमुक्त करून संसार सुखाचा करत आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️