रोजच गळतात.
मनाला कितीही बांध घातले तरी
डोळ्यातून चटकन बाहेर येतात.
पापणी आड किती लपवू म्हटले तरी
ते थोडीच तेथे राहतात.
तुझ्या विचारांच्या चक्रात
पटकन बाहेर पडतात.
किती समजावले तरी
थोडेच शांत बसतात.
माझेच हात त्याच्या मदतीला येतात.
पुसून अश्रूंना समजूत स्वतःची
स्वतःलाच घालून घेतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️