जो मला जसा समजेल तशी मी
कोण सखी मैत्रीण म्हणतं,तर
कोणी ताई म्हणतं,कोण मेघा म्हणतं,
पण मी स्वाभिमानी सरळ स्वभावाची आहे.
खोट्य बोलणं आवडतं नाही व खोटं बोलणारी माणसं ही अजिबात आवडत नाही. काही असेल ते खरं सांगून मोकळं होते.नाही काही पटलं शांत राहते.पण
एखादी गोष्ट मनावर घेतली.आणि डोक्यात पक्की केली तर ती गोष्ट मी करतेच.
मग तेथे मला त्रास होवो कोणी काही बोलो.
ती करायची म्हणजे करायाच काही ही होवो.
असा माझा स्वभाव..
मला कोणाची खोडी काढणे किंवा भांडण पटापट कोणाच्या मनाला लागेल असे बोलणे मला जमत नाही.
छक्के पंचे माहित नसलेली अशी मी
माझा स्वभाव तसा सरळ साधा
एकतर मी स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही. पण एखाद्याला जीव लावला तर मला किती ही त्रास झाला तरी साथ देते. पण तिचं व्यक्ती
काही कारणाने मनातून उतरली की मग मी त्या व्यक्तीकडे काहीही झालं तर बघत ही नाही. अशी माझी ओळख त्यातून कोणाला माझी ओळख कशी वाटते सांगा तशी मी...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️