दुःखाला सावरून स्वतःला जिंकून
घेणे पुरेसे आहे.
वेळोवेळी क्षणोक्षणी पावलोपावली
तुझी आठवण येणे साहजिक होते.
दुखले खुपले तुझी आठवण येते.
मग डोळ्यांच्या पापण्या पाणावतात.
सुखांत आनंदात तुझी आठवण येते.
मग चेहऱ्यावरचे हास्य लोप पावते.
तुझ्या जाण्याने दुःख खूप मोठे आहे.
ती उणीव भरून निघणे अवघड आहे.
ह्या स्वार्थी अप्पलपोटी जगात
स्वतःला जिंकून घेणे महत्वाचे आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️