जेवढं शांत तेवढी पिळवणूक जास्त
आज बदल होईल उद्या बदल होईल
असं किती दिवस गप्प बसायचं
सहनशक्तीचा अंत किती तो बघायचा.
जगाची रीतच आहे.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा
माती मऊ लागली की कोपरीने खोदायची
आता ठरवलं स्वतःसाठी उभं राहायचं.
स्वतःसाठी लढायचे
आपणच खरं हे दाखवून द्यायचं.
काही गोष्टी पटत नाही.
हे स्पष्ट पणे सांगायचे.
जेवढं मुळूमुळू रडू तेवढं जगाला
बरंच असतं.
मग चालू होते तिची पिळवणूक
नेहमी शांत नाही राहायचं
स्वतःसाठी ठामपणे उभं राहायचं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️