उदंड असतील, हे कष्ट सारे
तरी अपयशाचे वारेच हाती आले.
खूप खूप कष्ट करून
तुला सुखाच्या सावलीत आणले होते.
टायफड झाला तेव्हा ही
तुला दिवसरात्र सेवा करून
मरण्याच्या दारातून बाहेर आणले होते.
त्यांतच तुला मानसिक आजाराने
घेरले होते.
त्यातून लहान मुलासारखे समजाऊन
सतत साथ देऊन. त्यातून बाहेर काढले.
कॅन्सर सारख्या शेवटच्या स्टेजच्या
परिस्थिती असताना.
सुध्दा कशाचाही विचार न करता
दिवस रात्र एक करून त्यातून
त्या आजारातून बाहेर काढले होते.
वयाच्या अवघ्या वीस वर्षांपासून
फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच
जगले
या सर्व परिस्थितीत
कधी तुझी आई, कधी बहीण,
तर कधी खास मैत्रिण झाले.
बायको तर तुझी हक्काची होतेच.
हे सर्व रोल करता करता.
कष्ट करून मुलालाही शिकवलं
त्याला ICWA केलं.
हे सर्व करताना मला किती
त्रास झाला किती कष्ट पडले.
हे फक्त माझ्याच जीवाला माहित.
हृया सर्व परिस्थितीवर
मात करून आता कुठे सुखाचे
क्षण आनंदाचे जगत होते.
तर नियतीला ते मान्य नव्हते.
नियतीने माझ्या नशिबी अपयशाचेच
वारे लिहिले होते.
कोरोनाने एक दिवसांत होत्याच
नव्हतं करून तुम्हाला माझ्या पासून
दूर घेऊन जाऊन.
शेवटी एक दिवसांत अपयश
माझ्या पदरी टाकले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .