तुझे माझे कितीही कलह
झाले तरी
माझी साथ तुलाच आहे.
जस मीठा शिवाय अन्नाला
चव नाही.
तस तुझ्या शिवाय माझं जीवन
अपूर्ण आहे ग वेडाबाई.
साखर दुधात विरघळते.
मीठ पाण्यात विरघळत
तसा मी तुझ्या प्रेमात विरघळतो.
माणूस म्हटला की कलह होणार
कुरबुरी ह्या चालूच राहणार
वेडाबाई कलह किती ही
झाले तरी
साथ तुझी असावी खरी.
तुझ्या सोबतीची
ती मजा च वेगळी आहे.
जशी दिवा आणि वात
तशी तू आणि मी
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .