नवऱ्याच्या माघारी अहोरात्र दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून
मुलाला उच्च शिक्षण दिले. का तर तो शिकून सवरून मोठा साहेब होईल व आपले हे कष्टाचे दिवस संपतील.
कधीतरी आपले सुखाचे दिवस येतील
मुलांसोबत सुखाने चार दिवस राहता येईल.
म्हणून त्याला कधीच कशाची कमी जाणवून दिली नाही.
जे हवं ते जे मागायचा ते तिने कष्ट करून वेळेला स्वतःअर्धी भाकरी
खाऊन दोनच लुगडी वर्षभर वापरून
स्वतःची हौसमौज इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या.
कष्ट हेच माझं पंढरपूर काशी चारधाम यात्रा असं समजून स्वतःला कष्टात झोकून दिल.
व मुलाला मोठा साहेब बनवल.
तो उच्च शिक्षण घेऊन साहेब बनून
तिला येथेच खेड्यात ठेवून निघून गेला.
आता ती द्वेष मनात न करता तमा न बाळगता स्वतःच्या अर्धी भाकरीसाठी कष्ट करते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
खूप सुंदर लिहिले आहे अलक 👌👌👌
ReplyDelete