वचन दिले होते ना रे
मग का गेला अर्ध्यावर
डाव टाकूनी
असा काय गुन्हा केला होता.
काही न सांगता न बोलता
गुपचूपपणे माझ्या
आयुष्यातून निघून गेला.
तुला कसं काहीच
वाटलं नाही का रे
आपण तिला काहीच न
सांगता जातो आहे.
एक सेकंद पण
माझा विचार आला नाही का
आपण आयुष्यभराच नातं
एक क्षणात तोडून जातो आहे.
असलं कसलं रे नेहमी एकत्र
राहण्याच खोटं वचन दिलं होतं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .