हात हात घालून देवा
ब्राह्मणांच्या साथीने
नातीगोती समाज
यांच्या समोर वचन घेतात.
संसाराला सुरुवात करून
नव्याचे नऊ दिवस संपताच
मग सुरू होतात कुरबुरी
हुंडा मानपान जेवणावळी
टोमणे अपमान त्रास देणे
छळवणूक करणे.
मग सुरू होते मालिका
हुंड्यासाठी मारझोड
घरातून बाहेर काढणे.
जाळणे मारणे ढकलून देणे.
उपाशी ठेवणे मुलगीच झाली.
म्हणून त्रास देणे.
अपत्य लवकर नाही झाले.
दोष फक्त तिलाच देणे.
पटत नाही घटस्फोट घेणे.
मग कसले देवा ब्राह्मणच्या
साक्षीनी नेहमी एकत्र राहण्याचे
वचन दिले असते.
एकमेकांना छळायचे की
एकमेकांना समजून घ्यायचे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .