शशांक खूपच भाळला होता. त्याचा ही स्वभाव शांत सोज्वळ अभ्यासू असा होता.
दोघं ही मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.
असेच छान दिवस जात होते. तो तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून प्रेमात पडला होता. पण सांगायची हिम्मत होत नव्हती.तो खूप प्रयत्न करावयाचा तिच्या समोर प्रेम व्यक्त करण्यासाठी पण ते त्याला जमलंच नाही. गॅदरिंग व सगळे डे वगैरे संपून जो तो फायनल परिक्षा साठी व आपलं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी अभ्यासला लागले. सर्वांनाच पेपर छान गेले. व जो तो आपापल्या इंद्रधनुष्याशाच्या स्वप्नांना मनाशी घेऊन गावी जाण्यास तयार झाले.
शशांक व शामा च गाव तसं शेजारी शेजारीच होतं. ती व शशांक पण गावी निघाले. आणि शशांक तिच्या सोबत भविष्य बद्दल बोलू लागला. बोलता बोलता त्यांने सांगितले की मी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तुझ्या वर मनापासून प्रेम करतो मला नोकरी लागली रे लागली की पहिला तुझा हात मागायला तुझ्या घरी येणार ती आश्चर्यचकित झाली.व लाजून खाली मान घालून बोलू लागली. शशांक हे काय बोलतो तू कधी बोलला नाही. बोलायची हिंमत कधी झालीच नाही ग शामा
मला आता हि संधी हुकवायची नव्हती.
आणि अशी संधी परत आली नसती. व मी माझ्या प्रेमाला कायमचा गमावून बसलो असतो. म्हणून तर मी तुझ्या सोबत निघालो. तेवढंच दोन तासांच्या प्रवास तुझ्या समोर माझं मन मोकळं करता येईल.
मनातील गोष्ट सांगता येईल.
शशांक म्हणाला आता तुझं मत सांग मी तुला आवडतो का? तुझं ही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे का? काय असेल ते मी ऐकायला तयार आहे.नाही म्हणालीस तर आयुष्यात परत भेटणार नाही. माझी सावली ही तुझ्या आयुष्यावर संसारावर पडणार नाही.एवढा लांब मी निघून जाईल माझी कर्तव्य पार पडायला. तिने ही त्याला हो मी ही तुझ्या वर तेवढंच मनापासून प्रेम करते.आपली जोडी अशीच कायम राहू दे.मी वाट पाहत आहे.
लवकर ये. असे ती ने सांगितले व ती तिचा स्टॉप आला म्हणून उतरून निघून गेली.
असे छान सोनेरी इंद्रधनुष्याचे स्वप्न घेऊन दोघेही आपापल्या घरी पोहचले.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .