खूप काही बोलायच होत.
खूप काही सांगायचं होत.
असा मध्येच हात सोडून
तू निघून का गेला.
बोल आता कोणाशी बोलू
मनाची व्यथा कोणाला सांगू
स्वप्नात ही येतो तर शांतच असतो.
काहीच बोलत नाही. बोल रे
स्वप्नात तरी बोलून मनमोकळे कर.
वेळ अशी अचानक का आली.
तू काहीच न बोलता
कायमचा निघून कसा गेला.
तू कायमचा सोडून जातो.
यांची जरा सुद्धा कुणकुण
लागून दिली नाही.आशा
काही गोष्टी न बोललेल्या राहिल्या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .