त्यांचं त्या नेहमीच्या ठिकाणी ती आली होती. ती जागा आमच्या दोघांची आवडीची जागा होती. शांत निसर्गरम्य असा तो परिसर होता. तेथेच तर आम्ही भेटायचो मनातील गुंजगोष्टी एकमेकांना सांगायचो.
तिथेच तर आम्ही एकमेकांना प्रेमाची कबूली दिली होती. ती जागा आमच्यासाठी खास जागा होती.
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी व आम्ही एकमेकांना प्रेमाची कबूली दिली त्या दिवशी मी आवर्जून तेथे जायचो.
थोडावेळ तेथे बसून आमचे ते दिवस आठवून तेथे थोडं रममाण होऊन तू जेथे कोठे असशील तेथे सुखी राहा. असे म्हणून मी तेथे त्या ठिकाणी दोन चाफ्याची फुले ठेवून यायचो.
तो दिवस ही तोच होता. तिचा त्या दिवशी ५०वा वाढदिवस होता. म्हणून मी आज तिच्या साठी एक छान कविता करून व दोन चाफ्याची फुले घेऊन गेलो होतो.
मी जायच्या आधीच ती तेथे येऊन बसली होती.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
अरे हि येथे कशी काय आमच्या दोघांची नजरानजर झाली. दोघांही काय बोलावे सुचेना फक्त दोघं एकमेकांकडे पाहत होतो.
मग मीच पुढे होऊन.
तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ती चाफ्याची फुले दिली. ती भावूक होऊन रडू लागली. मी तिला रडून मोकळं होऊन दिलं
ती शांत झाल्यावर तिला तिच्यावर केलेली कविता म्हणून दाखवली. ती खूप खूष व आनंदीत झाली.
मी तुझ्या आयुष्यात आले नाही तरी तू अजूनही माझ्या आवडी जपून ठेवल्यास म्हणाली. व नेहमीच्या पद्धतीने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती फुले घेऊन मनसोक्त
त्याचा सुवास हुंकून ती फुले नेहमीच्याच स्टाईलने केसात माळली. थोडावेळ गप्पा मारून एकमेकांची जीवन कहाणी सांगून.
आता फक्त मैत्रीतील निरपेक्ष प्रेम जपायचे असे वचन एकमेकांना देऊन
हसतमुखाने तेथून निघालो.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .