तुच रे निर्जीव बनवत आहे.
मी आपलं नातं सजीव ठेवण्यासाठी
किती रे धडपडत आहे.
साथ तु ही थोडी दे.
संवाद आपलं साधत राहू
एक पाऊल मी पुढे करते
एक पाऊल तू ही पुढे ये.
शिष्टपणा बाळगून काहीच होत नाही.
फक्त नात्यातील गोडवा
कमी होऊन वीण उसवली जाईल
शिष्टपणा मला ही खूप पाळता येतो.
स्वाभिमान माझा आडवा आला तर
नातं आपलं कायमच दुरावले जाऊन
संपून जाईल..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .