पायी चालून देत नाही.
घोड्यावर बसून देत नाही.
तू जगाचा नको विचार करून
कशाला काही मनाला लावून घ्यायच
झालं गेलं सोडून दे.
आता बिनधास्त जगायला शिक
तुला हवं तसं तू तुझा शॄंगार कर.
तुला वाटले मस्त फिरून यावे
जाऊन फिरून येत जा.
काही खावे वाटले खाऊन येत जा.
तुला वाटले तुझ्या आवडीच्या
क्षेत्रात जॉब करावा.
खुशाल जॉब करायला जा.
तुला समाजसेवा आवडते
एखाद्या आश्रमात जाऊन
खुशाल मदत कर.
तू तुझं कर्तव्य पूर्ण केलं.
कशाला काही मनाला लावून घ्यायचं
जगाचा विचार नाही करायचा
झालं गेलं ते सोडून द्यायचं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अतिशय सुंदर...
ReplyDelete