मनाला लावून घेतेस.
या वेडूच एकदा ऐक
संसाराच्या सारीपाटावर
सगळं असंच असतं.
सुख दुःख येतात जातात.
जन्म मृत्यू अटळ आहे.
किती दिवस विचार करणार.
किती त्रास करून घेणार.
किती दिवस झुरत बसणार
घडणाऱ्या गोष्टी घडणारच
झालं गेलं सोडून दे.
तुझ्या गुलाबी ओठांवर
पुन्हा हास्य येऊ दे.
हासता ना तुझ्या गालावरची
खळी पुन्हा उमलू दे.
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात
पुन्हा चमक येऊ दे.
झालं गेलं ते सोडून द्यायचं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .