वयाने लहान होती.
लहान वयात लग्न झालं.
छान सुरळीत सगळं चालू होत.
अचानक परिस्थिती बदली
आलेल्या परिस्थितीला एकटीच
टक्कर देत होती.
पण परिस्थिती तिच्या हाताबाहेर गेली.
काय करावे समजेना.
स्वतःला समजून सांगू लागली.
आता परिस्थिती बदलली आहे.
स्वाभिमान बाजूला ठेवून
जगायला पाहिजे.
तरच आलेल्या परिस्थितीवर
आपण मात करू शकतो.
जड अंतःकरणाने पाणलेल्या डोळ्यांनी
तिने तिचा स्वाभिमान बाजूला सारला
तो स्वाभिमान बाजूला सारताना
तिला काय त्रास झाला
तो फक्त आणि फक्त
तिच्या मनाला माहित
स्वतःला समजून घेऊन
तिने मदत घेतली व
आपली परिस्थिती बदलली.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .