खिडकीचे दार ठोठावले
तशी माझ्या मनाची दारे उघडली.
आणि तुझीच तर आठवण
मनाला करून गेली.
तोच प्रश्न पुन्हा आठवला
असा कसा रे तू मला सोडून गेला.
कसं रे विसरु तुला
वाऱ्याच्या झोक्याने येणाऱ्या
त्या केसांच्या बटा
तो साडीचा उडणारा पदर
ती धडधडणारी छाती
सांग ना कसं कसं मी स्वतःला
सावरू आवरू
तोच प्रश्न पुन्हा आठवला
कसं रे विसरु तुला?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .