चित्रपटाची कथा वेगळी असते.
जन्माला येऊन एन्ट्री होते.
बालपण सुखाच असतं.
कसली काळजी नाही
कसली जबाबदारी नाही.
मस्ती मजा खाणे पिणे
लाड कौतुक हट्ट पुरवूण घेणे हे सगळ
होतं मोठे कधी होत समजत नाही.
काॅलेज प्रेमप्रकरण एन्जॉय करत.
आयुष्याचा चित्रपट मध्यांतरावर येतो.
पुढील एंट्री असते कर्तबगारीची
लग्नाच्या बंधनात बांधून घेऊन चालू होतं जबाबदाऱ्या कर्तव्य काळजी टेंशन
आनंदाने तर काही दुःखाने भरलेल्या या रंगभूमीवरचा कलाकार थकून भागून पार पाडून या चित्रपटाचा शेवट होतो.
शेवट झाल्यावरच कळत तो आयुष्याचा चित्रपट व कलाकार कसा होता.
आयुष्याच्या चित्रपटातील त्या कलाकाराच कौतुक मात्र स्मशानात गेल्यावरच होत.
बाबूमोशाय ये जिंदगी हैं जिंदगी
हम सब यहाँ की कठपुतली हैं!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
क
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .