त्या राजकारणात बरेच असतात रहस्य
ते आपल्या सारख्या सरळ साध्या माणसांना कोठे कळतात.
मग त्यातून कोणाला मारलं जातं तर कोणाला विनाकारण शिक्षा दिली जाते.
कसले ही आरोप करून त्याला बंदिस्त केलं जातं तर काही गोष्टी त्यांच्या कडून कबूल करून घेतल्या जातात. आणि त्यातून त्या व्यक्ती शाप देतात तळतळतात.आणि ते पुढे कोठे तरी त्रास दायक ठरत आणि उगीच त्या वाड्यांना दोषी ठरल जाते.
तेथील वास्तुपुरुष सांगत असतो अरे बाबांनो
जे काही केलं ते माणसानी केलं माझा काय दोष मला का शापित ठरवता. पण आपल्या पर्यंत त्यांचा आवाज येतच नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .