मला माझा अभिमान आहे.
मला जमत नाही भांडण वगैरे करायला
आणि पटापट बोलायला मला नाही पटलं नाही जमलं तर सरळ बाहेर पडते. त्या ठिकाणाहून मी नाही पडत कोणाच्या भानगडीत मला नाही आवडत कोणाला त्रास द्यायला.
कोणी स्वतःहून सांगितले तर बरं
मला आवडत नाही सहानुभूती आणि
कोणाच्या आधाराची गरज
मी भलं माझं काम भलं असं मी राहते.
मनातील भावना मोकळ्या मनाने मांडते
सहानुभूती मिळवण्यासाठी नाही मांडत.
पण काही जणांना असं वाटतं मी सहानुभूती मिळवण्यासाठी लिहिते. किंवा वाचकांना माझ्या कडे खेचून घेण्यासाठी लिहिते.
पण तसं काही नाही.
मनात साठवून त्रास करून घेण्यापेक्षा कागदावर उतरवून मन मोकळं केलेलं चांगलं असतं.
काल्पनिक मांडलं तरी अरे तुमचं कॉलेज मध्ये अस होतं का? असं विचारतात.
प्रेमावर लिहिले तर म्हणतात अजून प्रेमावर लिहिते.अरे मला प्रेमावर लिहिण्याचा हक्क नाही का? माझं वय झालं का? फक्त ५१ वर आणि माझं नवरा नाही म्हणून मी नाही लिहू शकत का? प्रेमावर काय चुकत माझं सांगा.
मी माझ्या जीवनात खूप स्वाभिमानाने जगले व जगते मला कोणाची सहानुभूती नको कोणाचा आधार नको.
मी माझं आयुष्य मला हवं तसं जगत आहे.
लोक घोड्यावर बसून देत नाही.
पायी ही चालून देत नाही..
तुम्हीच सांगा मायबाप वाचक कसं लिहावं...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .