मनात येईल ते मांडलं
तर सहानुभूती मिळवते
असं बोलतात.
मन रमवण्यासाठी लिहिले.
तरी ऐकून घ्यावे लागते.
काल्पनिक मांडलं तरी विचारतात
असं घडलं का तुमच्या जीवनात
तो वेडू कोण ती राणी कोण
काय लिहावे आता
विचार करून करून डोक
फुटायची वेळ येते कधी कधी
असं वाटतं दयाव सगळं सोडून
आणि जाऊन बसावे.
त्या हिमालयात शांतपणे
नको कोणाचे ऐकून घेणे.
आणि नको कोणाला काही बोलणे.
आणि त्याच त्या प्रश्नांची उत्तरे देणे...
या सगळ्याचा कंटाळा आला आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .